कडेलोट
आता वाटते हा वादळ पाऊस कधी संपणारच नाही….
निसर्गाची लागलेली हाय वाटते कधी शमणारच नाही…..
पृथ्वीच्या गाभ्यात.. आत... खोल सगळच बिनसलं आहे
निसर्गाच्या आत्म्याचा तोल कुठेतरी खूप हलला आहे!
पूर्वी कसे नेमके असायचे
एकामागून एक ऋतु शिस्तीत यायचे.
निसर्गाच्या शहाणपणाला आपण किती धरावे गृहीत ?
प्रगतीच्या खोट्या नशेत किती राहावे धुंदीत ?
सहा ऋतूंचे अद्भुत सोहळे त्यांचा वेगळाच दिमाख!
त्यांच्या चांगुलपणा वर माणसाचा फुकटचा रुबाब !!
ते ऋतु, ते संणवार, आता काही तसे राहिलेच नाही
शरदात केशरी चांदणे, दिवाळीत गुलाबी थंडी आता असत नाही
काळ्या आईच्या सोशिकतेची कदर माणसा तू कधी केलीच नाही
निसर्गाच्या चांगुलपणाची किंमत करण्याची माणसा तुझी कुवतच नाही
घेतला वसा टाकून दिला.... माणुस पार मातून गेला...
सृष्टीच्या दुः खाचा कढ़ हमसुन हमसुन उतु गेला
वसुंधरा माझी आई , तिच्यात मी... आणि माझ्यात ती.....
मला कळते तिचे सोसणे, तिच्या सारखेच माझेही जगणे.
सहनशीलतेचा कडेलोट होऊन......
ऐन दिवाळीत कडकडून विजा तिचे दु:ख कोसळते .....
तिचे सोसणे तेंव्हा माझ्याही डोळ्यातून आपसूकच पाझरते.....
© नेहा देव