मनाच्याही मनातले.
नेहा देव
१. जाळीखालचा खजिना
वय किती होते माझे? स्पष्ट आठवत नाही.पण मनाची माती तेंव्हा चांगलीच ओली असावी.म्हणूनच या प्रसंगाचा,त्या भावनेचा खोल ठसा अजूनही लख्ख लोलकासारखा प्रकाशतो आहे.आमच्या लोकमान्य नगरच्या कोपऱ्यावरच्या बिल्डिंगच्या टोकाला एक उघडी, उजाड बाग होती.त्या फ्लॅटमधले रहिवासी येऊन अजून स्थिरावले नव्हते. त्यामुळे उघडी बोडकी ती बाग अर्धवट स्थितीमध्ये बिचारी पडून होती. भिंतीच्या बाजूला जमिनीवर जाळीचे कंम्पाउंड होते, उभारले जाण्याच्या प्रतीक्षेत उताणे पडले होते.
तेंव्हा मुलांना रिकामा वेळही बराच असायचा. ( कसे काय? मला हे कोडे अजूनही उमगले नाहीये. तेंव्हा तास, मिनिटे यांचा span खरंच जास्त होता का? तेंव्हा मिळणारा तो leisure time गेला तरी कुठे?)
तर त्या रिकाम्या वेळेत इकडे तिकडे मनसोक्त हुंदडण्याची मुभा होती. त्या जमिनीवर पडलेल्या जाळीच्या खाली डोकावून बघण्याची अकारणच बालसुलभ हुक्की आली. त्यात डोकावून बघताच माझे डोळे लकाकले. मला काहीतरी अद्भुत तिथे गवसले . गुलाबाच्या नाजूक रोपट्यावर एक इवलीशी कळी जाळी आडून मला खुणावत होती.
ती इवलीशी लाल गुलाबी अर्धोन्मीलित कळी!!!!!
अरे!!!!
गुलाबाचे रोप!
त्यावर गुलाबी कळी !!!
ती उदयाला उमलणार!!!!
आणि हे फक्त मला आणि मलाच ठाऊक आहे!!!
तो फक्त माझा खजिना आहे.!!!!!
तो अद्भुत आनंद, ते अप्रूप
अजूनही अजूनही स्मरते--- भासते तितकेच रम्य,सुरम्य ! तितकेच रम्य.सुरम्य !!!!
...............आणि आज.....आता?
आता शम्भर/दोनशे/चारशे रुपये देऊन मी भरपूर रोपे आणू शकते,तितकीच फुलेंही सहज आणू शकते. खरी खरी आणि खऱ्यासारखी भासणारी खोटी!खूप महागडी सुद्धा!! बागेसाठी भरमसाठ खर्चही करू शकते.
पण त्या दिवशीचा ,त्या क्षणाचा तो बालसुलभ, निर्व्याज, निष्पाप, निखळ आंनद ?
बिन पैशाचा . पण लाखमोलाचा! --- नव्हे अनमोल. तो अनमोल खजिना गेला कोठे ?
कोण देईल परत आणून?
कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन !!!!
कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन !!!!
©नेहा देव
.
.
खूपच सुंदर लिखाण केलं आहे......... वाचून मनाला खूप बरं वाटलं......
उत्तर द्याहटवाMam thumhala tumhi sapadalya ase vatate
उत्तर द्याहटवा